औरंगाबाद- तीन दिवसांपासून बेपत्ता असलेली १४ वर्षीय मुलीचा शेततळ्यात तरंगताना मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली असून ही घटना आज सकाळी वाळूज परिसरातील भगतवाडी येथे उघडकीस आली. हत्या, आत्महत्या की अपघात अशा अनेक तर्क वितर्कांना परिसरात उधाण आले आहे.
प्रिया सतीश सरदार वय १४ वर्ष (मूळ गाव काळवेश्वर जी.बुलढाणा.ह मु भगतवाडी
शिवार, वाळूज) असे मृत मुलीचे नाव आहे. या
बाबत अधिक माहिती अशी की,
रामदास मिसाळ वय ६० हे त्यांच्या पत्नी
व प्रिया सरदार (वय वर्ष १४) जागृती सरदार (वय वर्ष १०) या दोन नातीसह भगवत वाडी
शिवारात राहतात. सात जानेवारी रोजी मिसाळ हे पत्नीसह त्यांच्या मूळगावी गेले होते
दरम्यान दोन्ही नातीच घरी होत्या. गुरुवारी दुपारी मोठी नात प्रिया ही शौचास गेली
मात्र ती परत आलीच नाही ही बाब माहिती होताच मिसाळ हे बुलढाणाहुन औरंगाबादला आले.
व त्यांनी प्रियाला फूस लावून अज्ञाताने पळविल्याची तक्रार वाळूज ठाण्यात दिली
होती. आज सकाळी काही नागरिक शेततळ्याजवळून जात असताना त्यांना पाण्यात एका मुलीचा
मृतदेह तरंगताना दिसला ही माहिती पोलिसांना कळताच वाळूज ठाण्याचे पथक घटनास्थळी
दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता
मृतदेह बेपत्ता प्रियाचा असल्याचे स्पष्ट झाले. प्रियाच्या नातेवाईक हत्या
झाल्याचे आरोप करीत आहेत. प्रियाची हत्या करण्यात आली की, मग तिने आत्महत्या केली किंवा पाय
घसरून ती पाण्यात पडली हे अध्याप स्पष्ट होऊ शकले नाही पोलिसांनी पाहणी केली असता
शेततळ्याच्या काठेवर असलेल्या प्लास्टिक कव्हरवर हाताचे ठसे आढळून आले आहे. मात्र
हे ठसे कोणाचे आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही दुपारपर्यंत वाळूज पोलीस घटनस्थळाची
पाहणी करित होते.